रोहित्र बंद करण्याची मोहीम त्वरित थांबवा! अन्यथा शेतकरी तिव्र आंदोलन करणार! - शेतकरी संघटना

रोहित्र बंद करण्याची मोहीम त्वरित थांबवा! अन्यथा शेतकरी तिव्र आंदोलन करणार!  - शेतकरी संघटना.
येवला - प्रतिनिधी
येवला तालुक्यात पावसाळ्यात एकही जोराचा पाऊस झाला नाही. भरपावसाळ्यात विहीरी कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात खर्च करून पावसाच्या भरवशावर मका, सोयाबीन, बाजरी, लाल कांदा यासारखी रब्बीची पिकं उभी केली. बॅन्क आणि सोसायटी कडून कर्ज अपलब्ध होत नसताना उधार उसनवार, किंवा सावकारी कर्ज घेऊन पिकासाठी खर्च केला. मात्र पाऊस न पडल्याने पिक करपुन गेली. काही ठिकाणी फक्त चारा होईल, जेमतेम पाटाखालील काही भागात वीसपंचविस टक्के खरिप पिक हातात येण्याची स्थिती आहे. 
शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अर्थिक संकटात सापडला असून या वर्षी शेतकरी आत्महत्या वाढतील कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कांदा, टोमॅटो पिका साठी भरमसाठ खर्च करून भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी  कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला तरी मायबाप सरकार मुग गिळून गप्प बसले आहे.असल्याचे शेतकरी संघटनेने निवेदनात सांगितले. 
     पावसाळ्यात येवले तालुक्यात 29 गाव आणि 19 वाड्यावर पिण्याच्या पाण्याचे टँकर चालु आहेत.पालखेड डाव्या कालव्यावरील ओव्हर फ्लोच्या रोटेशन मुळे पंधरा वीस टक्के भागात नदीवरील बंधारे भरून दिले असले तरी ते पाणी एक महिन्याच्या वर जीवनात देऊ शकत नाही. 
     शेतकऱ्यांच्या वस्तीवर पिण्या साठी व जनावरासाठी बोअरवेल शिवाय पाण्याची सोय नाही. मात्र  विज वितरण कंपनीने वीजबिल वसुली साठी रोहित्र बंद करण्याची मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांना जगणे मुश्किल केले आहे.या मोहिमे विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळून तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदन आज शेतकरी संघटनेने येवला उप विभागीय अधिकारी मा.दराडे, तहसिलदार मा.वारूळे, आमदार छगन भूजबळ, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे सह भाजप तालुका अध्यक्ष, भाजपा शहराध्यक्ष यांना देण्यात आले. 
    निवेदनातील मागण्या अशा येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा व तालुक्यातील शेतकरीशेतमजूर ययांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.दुषकाळाच्या सुविधा तालुक्यातील जनतेला मिळवून द्याव्यात.   बील वसुली, बॅन्केची कर्ज वसुली त्वरित थांबवा, कांद्याला किमान  दोन हजार भाव जाहीर करून शेतकऱ्यांने विकलेल्या कांद्याची फरकाची रक्कम त्याच्या खात्यात जमा करावी, टोमॅटोसाठी पाकिस्तान, बांगलादेश बॉर्डर खूली करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या देशात त्यांचा कांदा,साखर, आंबा येऊ शकतो मग आपले टोमॅटो का पाठवत नाही? ,कांदा पिकाला उत्पादन खर्चावर अधारित रास्त भाव मिळण्यासाठी आयात निर्यात धोरणात सातत्य राखून नविन बाजार शोधून संबंधित देशांशी करार करावे, कायद्याला किमान दोन हजार रुपये क्विंटल भाव द्यावा. 
      शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतु पाटील झांबरे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे, तालुकाध्यक्ष अरूण जाधव, शेतकरी संघटना युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष योगेश सोमवंशी, बापूसाहेब पगारे, जाफरभाई पठाण, बाळासाहेब गायकवाड, अनिस पटेल, सुभाष सोनवणे,शंकर पुरकर, दत्तात्रय मोगल, दत्तु सादडे,  सुरेश जेजूरकर, भगवान बोराडे, सतिश जगझाप, जयराम वर्पे, वसंत पवार सह कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने