येवला मुक्तीभूमीच्या रस्त्यावर मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी

येवला मुक्तीभूमीच्या रस्त्यावर मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी


येवला : पुढारी वृत्तसेवा

दिशादर्शक फलक नसल्यामुळे येथील मुक्तीभूमीला भेट देणाऱ्या पर्यटक व नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथे दिशादर्शक फलक लावण्यात यावे अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे कार्यकर्त्यांनी केली आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी धर्मातरांची घोषणा केली त्या शहरात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून मुक्तीभूमीच्या विकासाचे काम झाले आहे.मुक्तीभूमीची भव्यदिव्य वास्तू पूर्णत्वास गेली असून मुक्तीभूमीच्या माध्यमातून शहराला नावलौकिक मिळाला आहे.ऐतिहासिक ठिकाण असलेल्या मुक्तीभूमीला भेट देण्यासाठी देशभरातुन अनुयायी व पर्यटक येत असतात शहराला लागून असलेले मनमाड,नगरसूल,वैजापूर, शिर्डी,कोपरगांव,निफाड या ठिकाणी असलेले रेल्वे स्टेशन तसेच बस स्टॅण्ड या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी मुक्तीभूमीकडे जाण्याचा मार्गदर्शक फलक लावण्यात यावे त्यामुळे बाहेर गावाहून येणारे पर्यटक तसेच नागरिक हे या ऐतिहासिक ठिकाणी विनाविलंब येऊ शकतील त्यामुळे या सर्व ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी  सुभाष गांगुर्डे,प्रकाश वाघ,सचिन सोनवणे,गोटू मांजरे,सुमित थोरात,  गणेश गवळी,योगेश तक्ते,योगेश सोनवणे, संतोष राऊळ, मुशरीफ शाह आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने