आताचे शिक्षण माणसाला हुशार बनवते प्रागतिक विचार व्याख्यान मालेत दुसरे पुष्प गुंफण्यासाठी ९ गझलकार, कवींचा ताफा






आताचे शिक्षण माणसाला हुशार बनवते

प्रागतिक विचार व्याख्यान मालेत दुसरे पुष्प गुंफण्यासाठी ९ गझलकार, कवींचा ताफा
येवला : प्रतिनिधी 

पूर्वीचे शिक्षण माणसाला शहाणे करायचे. आताचे शिक्षण माणसाला हुशार बनवते. अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाला मिळत नाही. मात्र काही प्रश्नांची उत्तरे अशी काही मजेशीर असतात की, या प्रश्नांचे उत्तर मी शोधलेच का? असा प्रश्न पडतो.मात्र प्रश्नांची उकल करताना जगणं राहून जातं, असे प्रतिपादन गझलकार, मुशायराकार सुरेशकुमार वैराळकर यांनी केले. 
    समता प्रतिष्ठान येवला आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्या आगोदर ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या भक्ती गीतावर समता प्रतिष्ठान संचलित मायबोली मूक बधिर विद्यालयातील विद्यार्थिनींनी समूह नृत्य सादर केले. यावेळी जिल्हा सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर, वैराळकर, शरद धनगर, कमलाकर देसले, अमित वाघ,  हेमलता पाटील, पुरुषोत्तम चंद्रात्रे, ज्ञानेश पाटील, गौरव आठवले, खालील मोमीन आदी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी टाकून आजच्या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.  व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शाहीर सुरेश कुमार वैराळकर यांनी गुंफले. यावेळी ते म्हणाले की, आज कर्ज घेता का असे विचारण्यासाठी फोन येतात ही चांगली बाब आहे. येवला पैठणी साठी जगात प्रसिद्ध आहे. पैठणी साठी कोरडे हवामान लागते. मात्र येवल्यातील वातावरण कोरडे असले तरी, येथील माणसं हृदयात ओलावा ठेवणारी आहेत, असे प्रतिपादन शाहीर, गझलकार, मुशायराकार सुरेशकुमार वैराळकर यांनी केले. जेव्हा लढाईचा खरा डँका झडायला लागला, तेव्हा जो तो आपल्या तंबूत दडायला लागला या गझल गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. आठही गझलकारांनी प्रत्येकी दोन दोन रचना सादर केल्या. या गझलांनी कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत गेला. 
यावेळी माजी आमदार मारोतराव पवार, प्रा. गो. तु. पाटील, डॉ. सुरेश कांबळे, विक्रम गायकवाड,एड. दिलीप कुलकर्णी, अविनाश पाटील, सुधाताई कोकाटे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, सलील कोकाटे, ऍड. दत्तात्रय चव्हाण, आजीजभाई शेख, आदी उपस्थित होते. 
प्रस्ताविक समता प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा प्रा. अर्जुन कोकाटे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. शिवाजी भालेराव यांनी केले. सर्व गझलकार पाहुण्यांचा परिचय कवी लक्ष्मण बारहाते यांनी करून दिला. आभार प्रदर्शन निर्मला गुंजाळ  यांनी केले.

व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्रा. मनोहर पाचोरे, प्रा. अजय विभांडीक,  मुख्याध्यापक रामनाथ पाटील, पंडित मढवई, दिनकर दाणे, कानिफनाथ मढवई, बाबासाहेब कोकाटे, नवनाथ शिंदे, बी. सी. चव्हाण, भाऊसाहेब मगर हे प्रयत्नशील आहेत.

थोडे नवीन जरा जुने