विद्यार्थ्यांसाठी भारम - रहाडी जादा व वेळेत एस.टी. सोडणेची काँग्रेस पक्षाची मागणी

विद्यार्थ्यांसाठी भारम - रहाडी जादा व वेळेत एस.टी. सोडणेची काँग्रेस पक्षाची मागणी

 येवला : पुढारी वृत्तसेवा
 तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे विद्यार्थ्यांच्या एस.टी. बाबतील समस्यांबाबत येवला आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांना निवेदन देण्यात आले.
       येवला आगाराची रहाडी भारम  ही बस सकाळी रहाडी भारम येथुन डोंगरगाव, तळवाडे, कोटखेडा, पांजरवाडी, सायगाव फाटा मार्गे     विविध गावातील विद्यार्थी घेवून येवला  बस स्थानक येथे येते. त्यानंतर दुपारी एक वाजता येवला येथून पुन्हा प्रवाशांना व विद्यार्थ्यांना घेवून भारम रहाडी येथे जाते. परंतु सदर भारम रहाडी या एस.टी. मार्गावर बरीच गावे असुन विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे एक एस.टी. प्रवाशी व  विद्यार्थ्यांसाठी अपुरी पडते. बस मध्ये विद्यार्थ्यांना बसण्यास जागा मिळत नाही, बस पूर्ण भरल्यामुळे बरेच विद्यार्थी बस मध्ये बसू शकत नाही तसेच बस मध्ये बसताना गर्दी असल्यामुळे अपघातही होतात. त्यामुळे अतिरिक्त एक बस सदर मार्गावर सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. 
      त्याचबरोबर दुपारी एक वाजता  येवला बस स्थानक येथून भारम रहाडी येथे जाणारी बस ही वेळेत सोडावी. दररोज बस सोडण्यास उशीर होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्यास उशीर होतो. जेवण वेळेत मिळत नाही, अभ्यासला वेळ मिळत नाही त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. 
त्यामुळे भारम रहाडी साठी जादा बस सुरू करावी व बस वेळेत सोडाव्यात या व ईतर मागण्यांबाबत आज येवला  तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या  येवला आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या समस्यांचा पाढा वाचण्यात आला. सदर निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा यावेळी देण्यात आला.
     यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, तालुकाध्‍यक्ष ॲड.समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, तालुका कार्याध्यक्ष सुखदेव मढवई, एन.एस.यु.आय. तालुकाध्यक्ष  अक्षय शिंदे, डोंगरगावचे सरपंच मारूती सोमासे, मच्छिंद्र सोमासे, राधाकिसन ढोकळे, नारायण बिडवे, अर्जुन ढोकळे, रोहन बिडवे, शाम ढोकळे, कृष्णा सोमवंशी, रितेश सोमवंशी, सुदर्शन सोमासे, इत्यादी सह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने