धरणाचे काम आणि मरण येई पर्यंत थांब हेच शासनाचे धोरण - आषाढी एकादशीला मागितली आत्मदहनाची परवानगी



'देवनाचा' सिंचन साठी मंत्रालया समोर आत्मदहनाचा इशारा
मुख्यमंत्र्यांना पाठवले अडीच हजार शेतकऱ्यांचे निवेदन

धरणाचे काम आणि मरण येई पर्यंत थांब हेच शासनाचे धोरण - आषाढी एकादशीला मागितली आत्मदहनाची परवानगी


येवला : पुढारी वृत्तसेवा

देवनाचा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करा, साठवण तलावात पाणी आडवा आणि शेतकऱ्यांना सिंचना साठी उपलब्ध करून द्या , अन्यथा आमचा संयम आता संपला आहे..पाण्याची वाट बघणारे अनेक शेतकरी  पाणी न बघताच मयत झाले...अजून किती वर्षे पाण्याची वाट बघायची ? अडलेले पाणी दाखवण्या साठी धडक कृती कार्यक्रम राबवा , अन्यथा येत्या 29 जून रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे 4 वाजता मंत्रालया समोर आत्मदहन करू असा इशारा येवला तालुक्यातील देवनाचा सिंचन प्रकल्पाच्या प्रस्तावित लाभार्थी शेतकऱ्यांनी दिला आहे.
तब्बल 2377 शेतकऱ्यांच्या सह्या असलेले  निवेदन सह्या  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  वन मंत्री सुधीर मनगुंटीवार व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी पाठवले आहे. तेच निवेदन नाशिक उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सामान्य प्रशासन अधिकारी भीमराज दराडे , तसेच मुख्यमंत्री सचिवालय यांच्या नाशिक विभागीय कार्यालयातील कार्यकारी अधिकारी तुषार शेरेकर यांना देण्यात आले. 

मुख्यमंत्री हे स्वतः च जलसंधारण मंत्री असल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली 
सर्व विभागांची मंत्रालयात एकत्रित बैठक लावण्याची मागणी जलहक्क संघर्ष समिती चे भागवतराव सोनवणे यांनी केली आहे.

अन्यथा कोणतीही इतर पूर्वसूचना न देता शेतकरी आत्मदहन करतील असेही कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

******
धरणाचे काम आणि मरण येईपर्यंत थांब
******
##############
4 पक्षाचे 4 मुख्यमंत्री झालेत, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आणि सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेत, संबधीत 
जलसंधारण मंत्री, जलसंपदा मंत्री , वन मंत्री किती तरी बदलून गेलेत, खात्यांचे सचिव निवृत्त झालेत.अनेक अधिकारी होऊन बदलून गेलेत ..असंख्य पाहण्या, असंख्य मोजण्या, असंख्य अहवाल, किती तरी परवानग्या आणि किती तरी मान्यता मिळाल्या, पण थेंबभर पाणी अडले नाही, 
फायलींचा प्रवास स्थानिक कार्यालय , मंडल कार्यालय, राज्य मुख्यालय, खोरे महामंडळ आणि राज्य शासन असा प्रवास वरून खाली आणि खालून वर सुरू आहे, प्रत्येक टप्प्यावर फाईल पुढे सरकण्या साठी आंदोलन करायची का असा संतप्त सवाल जलहक्क संघर्ष समिती चे भागवतराव सोनवणे यांनी केला आहे.
***************
तालुक्यातील देवदरी येथील प्रस्तावित देवनाचा सिंचन प्रकल्पा साठी 2012 पासून शेतकरी पाठपुरावा करत आहेत... 11 वर्ष होईनही थेंबभर पाणी लोकांना बघायला मिळाले नाही,  मागणी करणारे शेतकरी जग सोडून गेलेत...आहे त्या शेतकऱ्यांना २०२४ पूर्वी अडलेले पाणी दाखवायचे असेल धरणाचे काम तातडीने सुरू करा , संबधीत खात्यांची सर्व मंत्रालयात संयुक्त एकत्रित बैठक लावून एक खिडकी निर्णय घ्यावा अशी समितीने  केली आहे. 

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देवनाचा कृती समितीचे भागवतराव सोनवणे व लाभार्थी शेतकर्‍यांनी आजवर अनेक उग्र आंदोलने केली आहेत. मात्र प्रत्येक विभागाकडे स्वतंत्र पाठपुरावा करण्यात शेतकर्यांची दमछाक होत आहे, ११ वर्षे  निघून गेली आहेत

 20 जानेवारी 2014 रोजी जलविज्ञान संस्थेचे या प्रकल्पासाठी ६५ दशलक्ष घनफुट (१८४० सहस्त्र घन मिटर) क्षमतेचे प्रमाण पत्र मिळाले आहे , सविस्तर प्रकल्प अहवालास   तांत्रिक मान्यता मिळून  राज्य शासनाची १२ कोटी ७७ लाख , ३६ हजार १५३ रुपयांची प्रशासकीय मान्यता दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी मिळाली आहे. मात्र नुसती निविदा प्रक्रिया राबविण्यात २ वर्ष लागली , दरम्यानच्या काळात समुद्धी महामार्गासारखे महाकाय प्रकल्प पूर्ण होतात , त्यांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी मिळतात ,शेतकऱ्यांची मागणी असलेल्या विषयांवर मात्र सरकार सोईस्कर पणे दुर्लक्ष करते.

देवनाचा सिंचन प्रकल्पासमोरील अडचणीं ची सोडवणूक करणे कामी महाराष्ट्र सरकार चे  संबंधित कॅबिनेट मंत्री ,प्रधान सचिव , विभाग प्रमुख व केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालय संबधित विभाग प्रमुख यांची संयुक्त बैठक लावून एक खिडकी योजनेसारखी सर्व अडचणी एकाच बैठकीत मार्गी लावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केली आहे . निवेदनावर कृती समितीचे  सचिव जगनराव मोरे ,कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात, सह सचिव अर्जुन दाणे , विनायक थोरात यांच्या सह 2380 शेतकऱ्यांच्या निवेदनाव सह्या व अंगठे आहेत .

या प्रकल्पामुळे रहाडी, खरवंडी, देवदरी या गावामधील प्रत्यक्ष 358  हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असून अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून भारम, कोळम खुर्द, कोळम बु. रेंडाळे या शिवारातील भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनाचा प्रश्‍न सुटणार आहे.कायमच अवर्षण ग्रस्त असलेल्या डोंगरी भागाला जल संजीवनी मिळणार आहे. येवला तालुक्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे.हा राज्यस्तरीय प्रकल्प असून आजवर २०१२ नंतर च्या सर्व जलसंपदा, मृद व जलसंधारण, कृषि , वने , पर्यावरण,  या  अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातून हा विषय गेला आहे , यापुढेही या विविध खात्यांच्या संयुक्त समन्वय साधून प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो . मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे .
खात्यांचे मुख्य सचिव , महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वन संरक्षक आणि केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय यांचे मंत्री व सचिव यांनी संयुक्त बैठक घेऊन  आपले केंद्रातील मंत्री पद यांच्या  प्रभावाने राज्य आणि केंद्र सरकार कडून प्रकल्पास पूर्णपूर्ण करावा असेही निवेदनात म्हटले  

***********
असा आहे देवनाचा सिंचन प्रकल्प :-
************
एकुण खर्च मान्यता १२ कोटी ७७ लाख , ३६ हजार १५३
लाभार्थी गावे :- राहाडी खरवंडी , देवदरी
सिंचन क्षमता - ३५८ हेकटर
उपलब्ध होणारे पाणी ६५.३३ दश लक्ष घनफुट
धरणाची लांबी २२५ मीटर
धरणाची उंची १६. १८ मीटर
सांडव्याची लांबी ९० मी
बुडीत क्षेत्र ५७ हेक्टर

****************
थोडे नवीन जरा जुने