साई पालखी ला जाणाऱ्या धुळे येथील महिलेचा येवल्यात मृत्यू


साई पालखी ला जाणाऱ्या धुळे येथील महिलेचा येवल्यात मृत्यू
येवला . प्रतिनिधी
मनमाड-शिर्डी मार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून  येवला तालुक्यातील तांदुळवाडी फाट्यानजीक साईबाबा पालखी सोहळ्यात दिंडीत पायी जाणाऱ्या वारकरी महिलेला सोमवारी  सकाळी टॅक्सीची जबर धडक बसल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे  याबाबत सविस्तर माहिती अशी धुळे जिल्ह्यातील भाविक गुरुपौर्णिमा सोहळ्यासाठी शिर्डी येथे दिंडीत पायी जात असताना यातील एक महिला सुरेखा बाळू कुलकर्णी यांना काळी पिवळी वाहनाची जबर धडक बसल्याने या वारकरी महिलेचे जागीच मृत्यू झाला आहे.याच मार्गावर काल वारकऱ्यांच्या वाहनाचा अपघात होऊन 8 वारकरी जखमी झाल्याची घटना ताजी असताना हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे
थोडे नवीन जरा जुने